मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकरी कर्जमाफी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. ही घोषणा त्यांनी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर केली.
बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला.
कर्जमाफीमध्ये एक मोठी अट
सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यामध्ये एक मोठी अट ठेवली आहे. ही अट म्हणजे, शेतकऱ्यांची पात्रता तपासण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे.
या समितीच्या माध्यमातून योग्य, गरजू आणि पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल.
है पन वाचा : मूळ आणि हस्तलिखित सातबाऱ्यात फरक आढळल्यास महसूल विभागाची मोठी कारवाई
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती | शेतकरी कर्जमाफी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कर्जमाफी मिळणार आहे, पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.
या कर्जमाफीत पारदर्शकता ठेवण्यासाठी ही अट गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्जमाफीची प्रक्रिया कशी असेल?
समिती स्थापन केली जाईल
शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाईल
योग्य शेतकऱ्यांची निवड केली जाईल
कर्जमाफी देण्यात येईल
आधी सरसकट कर्जमाफी झाली होती
या अगोदर झालेल्या कर्जमाफीत कोणतीही अट नव्हती. सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली होती. पण यावेळी महायुती सरकारने विशेष वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळची कर्जमाफी फक्त गरजू शेतकऱ्यांसाठी | शेतकरी कर्जमाफी
या वेळेस सरकार आर्थिक व सामाजिक परिस्थिती पाहूनच कर्जमाफी देणार आहे. आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही.
खऱ्या गरजू, मागासवर्गीय आणि लहान शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे.
PM Kisan Recovery : पीएम किसान योजना मोठी अपडेट अपात्र शेतकऱ्यांकडून हफ्त्यांची वसुली सुरू!
बच्चू कडूंना समितीत स्थान
बच्चू कडूंना या समितीत स्थान दिले जाणार आहे. त्यांनी जे प्रामाणिक आणि पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळेल, असे स्पष्ट केले आहे.
पण शेतकऱ्यांचा प्रश्न – “मिळणार कधी?” | शेतकरी कर्जमाफी
शेतकऱ्यांची चिंता ही आहे की,
“ठीक आहे, समिती करा, वर्गवारी करा,
पण नेमका निर्णय, GR कधी येणार?
कर्जमाफी मिळणार कधी?”
हे अजून सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
शेतकरी कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली आहे.
पण सरकारने एक अट ठेवली आहे – समिती स्थापन करून पात्रता तपासली जाणार आहे.
खरच गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
पण कधी मिळेल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
आपली प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.
शेअर करा, लाईक करा आणि अधिक अपडेटसाठी वाचत राहा – धन्यवाद ( शेतकरी कर्जमाफी ) !
PM Kisan Status : पीएम किसान Portal वर मोठा बदल 20व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्वाचं अपडेट!