Pik Vima Last Date : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 1000 कोटींचा शेवटचा हप्ता मिळणार या तारखेपासून

Pik Vima Last Date : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी ७६०० कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारकडून आतापर्यंत ६५८४ कोटी रुपये विमा कंपन्यांना अदा करण्यात आले आहेत. शेवटचा १००० कोटी रुपयांचा हप्ता येत्या २ ते ३ दिवसांत विमा कंपन्यांकडे जमा होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.


शेवटच्या हप्त्याची माहिती | Pik Vima Last Date

राज्य सरकारच्या शेवटच्या १००० रुपयांच्या हप्त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा प्रस्ताव मंजूर होऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

है पन वाचा : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा लवकरच मिळणार खरीप पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता

एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रक्कमेतील २० टक्के रक्कम विमा कंपन्यांचा नफा म्हणून गृहित धरली तरी राज्य सरकारला या माध्यमातून २३०० कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे.


योजनेचा एकूण खर्च आणि बचत

2024 साली पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत ८०६३.५६ कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता. मात्र, बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर ४०० कोटी रुपयांची बचत झाली होती.


यंदाच्या वर्षीपासून जुनी योजना लागू

यावर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याचे घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलीकडेच केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना २ टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे.

पीक विमा योजनेत कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही बदल केल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.


नवीन नियम काय आहेत? | Pik Vima Last Date

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना आता खालील प्रमाणे प्रीमियम भरावा लागणार आहे –

  • खरीप हंगामासाठी : २%

  • रब्बी हंगामासाठी : १.५%

  • नगदी पिकांसाठी : ५%

उर्वरित पीक हप्ता केंद्र आणि राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

Tur Rate Today : आज तुरीचे दर किती आहेत? कोणत्या बाजारात किती भाव मिळाला?


नैसर्गिक आपत्तींचा समावेश

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानावर भरपाई मिळणार आहे. त्यामध्ये खालील घटनांचा समावेश आहे :

  • वीज कोसळणे

  • गारपीट

  • वादळ

  • चक्रीवादळ

  • नैसर्गिक आग

  • पूर

  • क्षेत्र जलमय होणे

  • भूस्खलन

  • अतिवृष्टी

  • दुष्काळ

  • पावसातील खंड

  • किड आणि रोग

या सर्व बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागू केली जाणार आहे.


शेवटचा निष्कर्ष | Pik Vima Last Date

शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे. शेवटचा हप्ता लवकरच विमा कंपन्यांकडे जमा होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर मिळेलच, पण भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासही मिळेल ( Pik Vima Last Date ) .

Bacchu Kadu Uposhan : बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण चौथ्या दिवशी बच्चू कडूंची लढाई सरकारविरुद्ध


 महत्त्वाचे मुद्दे – एक झलक

मुद्दामाहिती
योजनाप्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)
एकूण विमा हप्ता₹८०६३.५६ कोटी
आत्तापर्यंत अदा₹६५८४ कोटी
शिल्लक हप्ता₹१००० कोटी (२–३ दिवसांत)
बचत₹४०० कोटी (बनावट अर्ज रद्द)
शेतकऱ्यांचा प्रीमियमखरीप – २%, रब्बी – १.५%, नगदी पीक – ५%

Leave a Comment